भुतांचे प्रकार
1)अवगत : विधवा स्त्रीचे भूत. हे आवळा किंवा नागचाफ्यावर वास करतात.
2)अलवंत : बाळंत होताना मृत्यू आल्यास स्त्रीचे ‘अलवंत’ नावाचे भूत होते.
3)आसरा :
4)कालकायक : कालकायकांची भुतं ही भैरवाच्या अंकित असल्याने, ती जास्त त्रास देत नाहीत. त्यांना तृप्त केल्यावर ती प्रसन्न होतात. त्यांची कृपा लाभलेला माणूस १२ वर्षे आनंदी व आरोग्यदायी जीवन जगतो. त्यानंतर त्याचा नाश होतो.
5)गानगूड :
6)गिर्हा : गिऱ्हा हे भूत कोकणाप्रमाणे घाटावरही नाव कमावून आहे. ते पाणवठ्यावर राहात असे आणि माणसाला पाण्यात ओढून नेऊन त्याची नाना प्रकारची चेष्टा करीत असे. ‘काय गिऱ्हा लागलाय मागे?’ हा वाक्प्रचार या गिऱ्हामुळेच रूढ झाला असावा.
7)खवीस : खवीस हे भूत दोन-तीन प्रकारचे आहे. खवीस जसे महारा-मातंगांचे असते, तसेच ते ॲबिसियन लोकांचेपण असे. हबशी किंवा सिद्दी जे कोकणात स्थायिक झाले, त्यांची भुते पण चौदाव्या-पंधराव्या शतकापासून कोकणात दिसायला लागली.
8)चकवा : चकवा हा अनेक गावांच्या सीमांवर राहतो, आणि रात्रीच्या वेळी वाटसरूंना भटकवत ठेवतो. चकव्यालाच मनघाल्या म्हणतात
9)चिंद : घाटावरचे हे भूत महिलेच्या पोटी जन्म घेऊन तिच्या वाट्याचे अन्न खाते, असे म्हणतात.
10)चैतन्य :
11)छेडा : छेडा म्हणजे अविवाहित महाराचे भूत. छेडा मुख्यत्वे वेशीवर राहात असते. शूद्रांची अर्थात महारा-मातंगांची भुते वर्षातून एकदा नारळ, केळी, साखर, कोंबड्यांचा किंवा बोकडाचा बळी दिल्यावर त्रास देत नाहीत. कधी कधी ही भुते होळीवर, डोंगरात किंवा जंगलात वावरत असत.
12)जखीण : सवाष्ण स्त्री मेल्यावर भूत झालीच तर ‘जखीण’ होते.
13)झोटिंग : कोळ्यांच्या किंवा मुसलमानांच्या भुतांना झोटिंग म्हणतात. झोटिंग किंवा खवीस हे जर अहिंदू असतील तर त्यांची बाधा दूर करणे, हे हिंदू देवऋषांच्या अावाक्यात नसते, अशी धारणा आहे.
14)झोड :
15)तलखांब : अविवाहित शूद्र पुरुष मेल्यावर भूत झालाच तर त्या भुताला ‘तलखांब’ म्हणतात.
16)दाव : कुणब्याच्या भुताला ‘दाव’ म्हणतात. हे बहुधा एकाकी भटकते.
17)देवाचार : लग्न झाल्यानंतर अल्पावधीत जो शूद्र मरतो, तो ‘देवाचार’ होतो. देवाचार भूत गावकुसाबाहेर चारी दिशेला राहते.
18)पीस :
19)ब्रह्मग्रह : वेदविद्यासंपन्न, पण ज्ञानाचा गर्व असलेल्या ब्राह्मणाचा आत्मा जेव्हा भूत होतो, तेव्हा अशा भुताला ‘ब्रह्मग्रह’ म्हणतात.
20)ब्रह्मराक्षस : ब्रह्मराक्षस हे पिंपळावर राहणारे सर्व भुतांमधील शक्तिशाली भूत असते. याच्या कचाट्यात कुणी सापडला, तर तो सुटणे अशक्य असते. ब्राह्मणांचा द्वेष करणारे, त्यांच्या कर्तव्यास हीन लेखणार व त्यांची चेष्टा करणारे अतृप्त आत्मे ‘ब्रह्मसमंध’ या भूतयोनीत जातात.
21)महापुरुष भूत : वेदपारंगत ब्राह्मणाच्या भुताला ‘महापुरुष भूत’ म्हणतात.
22)मुंजा : मुंज झाल्यानंतर सोडमुंज होण्याअगोदर एखादा मुलगा मरण पावल्यावर तो मुंज्या होतो. त्याचा आत्मा पिंपळावर किंवा विहिरीत वास करतो. उपनयन संस्कार त्रैवर्णिकात होत असल्याने ब्राह्मणांखेरीज क्षत्रिय आणि वैश्य या वर्णातही मुंजे असतात.
23)राणगा : विधुर माणसाचे भूत
24)लावसट : ‘अवगत’सारखेच विधवा स्त्रीचे भूत. हेही आवळा किंवा नागचाफ्यावर वास करते.
25)वाघोबा :
26)वीर श्रेणीतील भुते : ‘वीर’ श्रेणीतील भुते, ही अविवाहित क्षत्रियांची असत. कधी ती अ-मराठी किंवा परप्रांतीय क्षत्रियांचीही असत.
27)शाखिणी : अविवाहित स्त्रीचे भूत.
28)समंध : समंध ही दोन प्रकारची भुते असतात. पहिल्या प्रकारातील समंध हा संतती न झाल्यामुळे, आणि उत्तरक्रिया न केल्यामुळे होतो. त्याच्या नात्यातल्यांनीच त्याची इच्छा पूर्ण केल्यावर तो शांत होतो आणि आप्तांना मदतसुद्धा करतो. दुसऱ्या प्रकारातील समंध हा जिवंतपणी लोभी आणि इच्छापूर्ती न झालेला संन्यासी असतो. समंध झाल्यावर, तो पैसेवाल्यांना संपत्तीचा उपभोग घेऊ देत नाही.
29)सैतान :
30)हडळ : स्त्री बाळंत होऊन दहा दिवसांच्या आत मृत्यू आल्यास ती ‘हडळ’ बनते. हडळीलाच हेडळी, डाकण, सटवी असेही म्हणत
I'm cool
ReplyDelete