पुनर्जन्म marathi horror story by somnath kale part 3

घराची कथा ऐकण्यात त्यांना खूप वेळ गेला त्यांना आता लवकर रिंकीकडे जायचे होते उशिरही खूप झाला होता रात्रीचे 9 वाजले होते

रिंकीचे बाबा परत रात्री त्या भीतीने रूम मध्ये रिंकीला  घेऊन बसले टाचणी पडली तरी आवाज होईल इतकी शांतता होती त्या घरात पण थोड्याच वेळात आवाज यायचा चालू झाला रिंकीच्या बाबांना  याचीच भीती होती कोणीतरी जोरजोरात दरवाजा वाजवतंय अस त्यांना वाटू लागलं
रिंकीच्या आजोबा गाडी चालवत येत होते त्यांनी सकाळीच बघितलं होत कि  आज अमावस्या  आहे त्यांच्या मनात फक्त एकच भीती होती कि ते जोपर्यंत तिथे जात नाहीत तोपर्यंत त्या दोघांना काहीच होता काम नये त्यामुळे ते खूप जोरात गाडी चालवत येत होते
घरात दरवाजा वाजवण्याचा येणार आवाज आता खूपच मोठा येत होता रिंकीच्या बाबांना वाटलं कि खरंच बाहेर कोणीतरी आलं असेल म्हणून ते दरवाजा वाजवत असेल कोण आहे ते बघायला म्हणून ते आणि रिंकी खोलीबाहेर आले पण आवाज वरच्या खोलीतून येत होता
त्यांना वाटत होत कि लगेच या घरातून निघून जावं पण एव्हड्या रात्री त्या मुलीला घेऊन ते कुठे जाणार या विचाराने ते शांत होते वरून येणारा तो आवाज अजूनही चालूच होता शेवटी त्यांनी वर जाऊन बघायच ठरवलं ते रिंकीला घेऊन वर आले बघतात तर आवाज त्याच खोलीतून येत होता जी त्यांनी बंद केली होती त्यांच्यासमोर आतून कोणीतरी दरवाजा जोरजोरात वाजवत होत रिंकीच्या बाबांनी बांधलेला दोराही सुटत चालला होता आणि एका मोठा आवाज करत तो दोरा तुटला आणि जोरात दरवाजा उघडला
रिंकीच्या बाबांनी तिला हातात घट्ट पकडून ठेवलं होत आणि अचानक त्या दरवाजात एक बाई उभा राहिली तिचा तो अवतार बघून रिंकी खूप घाबरली आणि रडायला लागली रिंकीच्या बाबांची अवस्था हि काहीशी अशीच होती
'आज मला माझ्या मुलीला घेऊन जाण्यापासून कोणीही नाही थांबवू शकत '
हिहीही$$$ हिहीही$$$
'गौरी चल मी तुला घेऊन जायला आलेय'

रिंकी माझी मुलगी आहे आणि मी तिला काहीही होऊ देणार नाही
तिच्या बाबांचे हे शब्द ऐकून दामीनीचा आत्म्याने फार भयंकर रूप धारण केले हे बघून रिंकीच्या पप्पा तिला घेऊन पळत पळत खाली येऊ लागले  ती खाली आले तर तेव्हड्यात तिथे रिंकीच्या आजोबा हि आले होते  रिंकी रडत होती
'बाबा तुम्ही आलात बरं झालं '
'जावाईबापू रिंकीच्या जीवाला धोका आहे आपल्याला इथून ताबडतोब गेलं पाहिजे नाहीतर रिंकीच्या काहीही बरेवाईट होऊ शकत आणि ते दरवाजाच्या दिशेने चालू लागले पण लगेच दरवाजा बंद झाला  ती शक्ती त्यांना त्या घरातून जाऊ द्यायला तयार नव्हती रिंकीच्या आजोबा तो दरवाजा उघडण्याचा खूप प्रयत्न करू लागले पण सगळे प्रयत्न व्यर्थ दरवाजा उघडायचा नावच घेत नव्हता रिंकीच्या आजोबांना आता मोठ्या संकटाची जाणीव होऊ लागली
'जावईबापू काहीही झालं तरीही रिंकीच्या सोडू नका '
त्या घरात सर्वत्र हसण्याचा आवाज येऊ लागला घाबरलेले रिंकीच्या बाबा रिंकीला घट्ट घरून उभा होते

'ए म्हाताऱ्या तू माझ्या मुलीला मला घेऊन जाऊ नाही देणार'
तर तुझाही जीव घ्यायला मी मागेपपुढे बघणार नाही आज मला कोणीच नाही अडवू शकत
आज मी गौरीला घेऊन जाणार '
ती माझी मुलगी आहे ती मी तिला घेऊन जाणारच '
इतक्यात आजोबांच्या खांद्यावर कोणीतरी एक हात ठेवला आणि त्यांना काही कळायच्या आत त्यांना खांद्याला धरून जोरात मागे ओढलं आणि ते जोरात लांब जाऊन पडले आणि त्याक्षणी परत ती बाई रिंकिसमोर उभी राहिली आणि ती रिंकीला हात लावणार तोच तिचा हात जाळायला लागला त्यामुळे तिने तिचा हात लगेच मागे घेतला आणि आजोबांकडे बघितलं तर ते त्यांच्या गळ्यातली रुद्राक्षाची माळ काढून काहीतरी मंत्र म्हणत होते त्यामुळेच दामीनीचा आत्मा रिंकीला हात लावू शकला नाही
दामीनीच आत्मा आता खूप चिडला ती मोठ्याने ओरडत होती आणि त्याच वेळी घरातली काचेच्या वस्तू फुटू लागल्या
तिथं खाली पडलेला फळ कापायचे चाकू हवेत वर उचलू लागला आणि जोरात आजोबांच्या दिशेने फेकला गेला पण आजोबा लगेच बाजूला झाले त्यामुळे दामीनिचा तो वार वाया गेला आता ती खूपच रागात आली.
ती समोरच असलेली लाकडी खुर्ची जोरात रिंकीच्या आजोबांच्या दिशेने घसरत आली आणि ती खुर्ची आजोबांच्या गुढग्याला जोरात लागली आजोबा खाली पडले पण त्यांचं मंत्र म्हणायचे बंद होत नव्हते
'जावईबापू रिंकीला घेऊन जा लगेच '
दरवाजा बंद होता म्हणून रिंकीच्या बाबा तिला घेऊन पायऱ्या चढत वर जायला लागले पण तेव्हड्यात त्यांचा पाय कोणीतरी जोरात ओढला ते खाली पडले रिंकी एका बाजूला आणि ते एका बाजूला पडले त्यांनी रिंकीकडे बघितले तर ती बेशुद्ध पडली होती ते पटकन उठले आणि तिला उचलायला गेले तर रिंकी 10 फूट उंच हवेत उडाली दामिनी तिला उचलून वर घेऊन गेलीं आता आजोबाच्या मंत्राचाही काहीच परिणाम होत नव्हता म्हणून त्यांनी ती माळ रिंकीच्या दिशेने फेकली आणि ती माळ रिंकीच्या गळ्यात जाऊन पडली त्यासरशी रिंकी दमीनीच्या हातातून खाली पडली आणि लगेच तिच्या बाबांनी तिला हवेतच  झेलले
'म्हाताऱ्या तू गौरीला माझ्यापासून वेगळं करायला बघतोस तू आता संपालास'
आजोबा उठून उभा राहिले तर समोरच्या दामिनी होती बाहेर आलेले डोळे विस्कटलेले केस एका डोळ्यातून खाली वाहत येणार रक्त यामुळे तिचे रूप आणखीच भयानक दिसत होते
दमीनीं ने आजोबांच्या गळ्याला पकडलं आणि उंच एका हाताने उचलल आजोबा श्वास घेण्यासाठी धडपड करू लागले

'असच मारलं होत ना तुज्या नवऱ्याने गौरीला'

आजोबांचे हे शब्द ऐकताच तीना त्यांना लांब फेकून दिल आजोबा लांब जाऊन पडले
दमीनी ने रिंकीच्या शरीरात प्रवेश केला आणि तिला घेऊन ती वरच्या खोलीत पळत गेली
आणि दरवाजा लावून घेतला रिंकीचे आजोबा आणि बाबा तिच्या मागे मागे त्या खोलीत गेले खोलीचा दरवाजा आतून बंद झालेला होता
रिंकीच्या बाबांनी त्या दरवाज्याला जोरात धक्के मारायला सुरुवात केली आतून रिंकीच्या रडण्याचा आवाज येत होता शेवटी तो दरवाजा उघडला पण आत रिंकी नव्हती आजोबांचं लक्ष आरशात गेलं तर रिंकी त्या आरशाच्या आत मध्ये होती आणि आतून आरशाच्या काचेवर थापा मारत होती
रिंकीच्या बाबांना हे सर्व स्वप्नसारखाच वाटत होत कारण एखादा माणूस आरशात कसा जाऊ शकतॊ पण हे सर्व त्यांच्या डोळ्यासमोरत घडत होत आणि मुख्य म्हणजे त्यांच्या मुलीच्या बाबतीत  घडत होत त्यामुळे त्यांना या गोष्टीवर विश्वास ठेवावा लागत होता
ते आरश्या जवळ गेले पण आता रिंकीला बाहेर कसं काढायचं हा मोठा प्रश्न होता
तेव्हड्यात रिंकीच्या बाबांना दामीनीने मानेला पकडले आणि ओढत जोरात मागे घेऊन गेली आजोबा त्यांना वाचवायचा प्रयत्न करू लागले पण त्या शक्तीपुढे त्यांचा टिकाव लागणे  शक्य नव्हते रिंकीच्या बाबा इतके जोरात मागे ओढले गेले आणि मागे भिंतीला त्यांचे डोके जोरात आपटले
आजोबांनी परत मंत्र म्हणायचे चालू केले
'ए म्हाताऱ्या तुझ्या मंत्र शक्तीचा आता माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही '
थोड्याच वेळात गौरीच आत्मा तीच शरीर सोडेन आणि मग मी तिला माझ्या बरोबर घेऊन जाईल
मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मी रिंकीला काहीही होऊ देणार नाही
'ए म्हाताऱ्या मग आधी तुलाच ठार मारते मग माझ्या गौरीला घेऊन जाते
 आणि ती लगेच आजोबा समोर आली
 तिन म्हाताऱ्याच्या हाताला पकडलं आणि जोरात लांब फेकून दिल ते खाली पडले ते उठायचा प्रयत्न करू लागले तोच परत दामिनी त्यांच्या समोर आली आणि परत त्याच्या पायाला पकडलं आणि फेकून दिल वृद्ध झालेले आजोबा आता शांत झाले त्यांच्यात आत उठाण्याचीही ताकत राहीली नव्हती
'थोड्याच वेळात गौरीचा आत्मा तीच शरीर सोडेल
जावईबापू  आपल्याला लवकर काहीतरी केलं पाहिजे नाहीतर काहीतरी दुसरच व्हायचं
पण बाबा आता करायचं तरी काय ? रिंकीला या अरश्यातून बाहेर काढायचं तरी कसं
जवाईबापू प्रत्येक आत्म्याचा काहीतरी वीक पॉईंट असतो ज्याला तो सगळ्यात जास्त घाबरतो
आपल्याला ती कडी शोधावी लागेल जी या आत्म्याला जोडलेली आहे
विचार करा जावईबापू अशी कोणती वस्तू आहे का जिचा संबंध या आत्म्याशी असू शकतो
दामिनी परत समोर आली आणि रिंकीच्या बाबांना गळ्याला पकडून वर उचलले आणि जोरात लांब फेकले रिंकीच्या बाबा त्या पत्र्याच्या पेटीवर जाऊन आपटले त्यांच्या हाताला ती पेटी खूप लागली ते त्या पेटीवर आपटल्याने तिचा दरवाजा उघडला आणि त्यातून ती बाहुली खाली पडली
रिंकीच्या बाबांच्या लगेच लक्षात आलं कि ते जेंव्हा या रूम मध्ये आले होते त्यावेळेस रिंकीने हि पेटी उघडली होती आणि याच बाहुलीच्या पाहून ती बेशुद्ध पडली होती आणि तेंव्हापासूनच हे सगळे प्रॉब्लेम सूरु  झाले
त्यांनी ती बाहुली उचलली आणि आजोबांच्या दिशेने फेकली आजोबांनी ती बाहुली घेतली आणि जोरात जमिनीवर आपटली त्यासरशी जोराचा आवाज झाला जस कुणाला खूप त्रास होतोय असा आवाज
आजोबांच्या लक्षात आलं कि दामीनिचा  आत्मा या बहुलीशी जोडला गेलेला आहे
जावईबापू आपल्याला हि बाहुली नष्ट करावी लागेल दामिनी परत समोर आली आणि आजोबांवर वार करायचा प्रयत्न करू लागली
आजोबांनी ती बाहुली लगेच रिंकीच्या बाबांकडे फेकली आणि म्हणाले कि ह्या बहुलीला लगेच नष्ट करा
त्यांनी बाहुली घेतली आणि ते पळत त्या खोलीबाहेर आले त्यांच्या समोर फक्त रिंकीचाच चेहरा येत होता
ते बाहेर येताच  रॉकेल चा डब्बा शोधू लागले बरीच शोधाशोध केल्यानंतर त्यांना रॉकेलचा डब्बा सापडला आणि ते रूम मधून बाहेर आले  बाहेर येऊन बघतात तर आजोबा रक्ताने लथपथ होते बाबा पळत आजोबा जवळ आले
जावईबापू हि बाहुली आधी नष्ट करा
पण तुम्हाला हे अस कस झालं
माझं सोडा तुम्ही आधी हि बाहुली नष्ट करा रिंकीच्या जीव धोक्यात आहे
त्यांनी लगेच बहुलीवर रॉकेल ओतले आणि काडी पेटवणार इतक्यात दामिनी पळत त्यांच्या दिशेने आली आणि रिंकीच्या बाबांना घेऊन उंच हवेत उडाली आणि त्यांना वरून खाली सोडून दिल
रिंकीच्या बाबा खाली पडले पण ते परत उठून ती बाहुली जाळायला जाऊ लागले पण तोही प्रयत्न व्यर्थ गेला दामिनी त्यांना त्या बहुली पर्यंत पोहचू देत नव्हती
ते परत उठायचा प्रयत्न करू लागले आता त्यांचीही ताकत संपत आलेली होती तरीही ते त्या शक्तीशी प्रतिकार करत होते त्यांच्या समोर फक्त एकाच ध्येय होत रिंकीला यातून सुखरूप बाहेर काढायचं
त्यामुळे त्यांना आता हार मानून चालणार नव्हतं त्यांना लढत राहावं लागणार होत
ते परत उठले आणि त्या बाहुलीच्या दिशेने जाऊ लागले दमीनीच्या त्यांना पायाला पकडलं आणि भिंतीजवळ फेकलं आता त्यांच्यात आता हालचाल करण्याची हि ताकत शिल्लक नव्हती ते तसेच भिंतीला टेकून बसून राहिले त्यांनी खाली बघितलं तर तिथेच कडेची पेटी पडलेली होती त्यांनी ती उचलली बाहुली त्यांच्यापासून 5 फूट अंतरावर पडलेली होती
' तुझ्यासारख्या कितीही आल्या तरीही मी माझ्या रिंकीला काहीही होऊ देणार नाही '
आणि त्यांनी काडी पेटवली आणि त्या बाहुलीच्या दिशेने फेकली
दामिनी ते बघून त्यांच्या दिशेने पळत येऊ लागली ती त्यांच्या जवळ आली पण त्यांना हात लावणार तेव्हड्यात ती फेकलेली काडी बहुलीवर पडली आणि लगेच बाहुलीने पेट घेतला त्याक्षणी दामीनीच रूपांतर हि धुरात झालं आणि ती गायब झाली
दामिनी गायब होताच घरात लगेच शांतता निर्माण झाली जस काही घडलंच नाही तिथलं वातावरण शांत झालं हा पुरावा होता कि आता दामिनी इथे राहिली नाही
हे घडताच रिंकी त्या रूम मधून बाहेर आली आणि माझ्याकडे पळत आली
माझ्यात आता उठाण्याचीही ताकत राहिली नव्हती पण मला रिंकीला बघून खूप आनंद होत होता
मी रिंकीला एक मिठी मारली माझ्या चिमुकल्या रिमकीला आता काहीच धोका राहिला नव्हता
त्यानंतर आम्ही ते घर सोडलं आणि दुसरं घर घेतलं हे घर छान आहे आणि मुख्य म्हणजे इथे कोणतीही दामिनी नाही
आजोबा त्या घटनेनंतर 2 महिने हॉस्पिटल मध्ये होते आता ते ठीक आहेत
रिंकीला वाचवण्यात त्यांचं खूप मोठं योगदान आहे मी त्यांचे उपकार कधीही विसरणार नाही
दामिनी हि पूर्णपणे चुकीची होती असही नाही रिंकी हि गौरीच होती पण तिचा आता रिंकीच्या रूपात पुनर्जन्म झालेला होत्या त्यामुळे तिने रिंकीला तिची मुलगी म्हणणं हे चुकीचं होत मी तिलाही काहीच दोष देऊ शकत नाही कारण ती हि शेवटी एक आईच होती आणि तिची मुलगी तिला परत मिळावी या हेतूने ती हे सर्व करत होती
पण या सगळ्यामुळे माझ्या रिंकीच्या नाहक बळी गेला असता
पण आता सगळं व्यवस्थित आहे रिंकीही आत ते सर्व विसरली आहे
समाप्त

पुनर्जन्म punrjanm by somnath kale part-2

 त्या रूम मध्ये सर्वत्र तिच्या भयानक हस्यचा आवाज घुमू लागला.
' मी हिला घेऊन जाणार माझ्याबरोबर '
मी नlही सोडणार
कुणालाच नlही सोडणार '
पुनर्जन्म

हा आवाज खोलीमध्ये येऊ लागला
पण याचा माझ्या मुलीवर काहीही परिणाम होत नव्हता. ती शांत बसलेली होती माझा तर आता फक्त जीव जायचा बाकी राहिला होता. मी लगेच रिंकिला उचलले आणी त्या खोली मधून बाहेर आलो. बाहेर येताच मी त्या खोलीची कडी बाहेरून बंद  केली आणि मझ्या हातात बांधलेला असलेला देवाचा धागा मी सोडून त्या काडीवर मी तो धागा बांधला जेणे करून आतमध्ये जी काही दुष्ट शक्ती आहे ती बाहेर  येता कामा नये. माझ्या मुलीच रक्षण करण्याचा तो एक प्रयत्न.
मी ती रूम बंद करून माझ्या मुलीला घेऊन खाली आलो आणि माझ्या रूम मध्ये येऊन झोपलो पण झोप काही लागत नव्हती जरा डोळे लगले की लागले की डोळ्यासमोर त्या बाईचा चेहरा दिसायचा मी ती रात्र जागूनच काढली.
दुसऱ्या दिवशी मी माझ्या सासर्यांना कॉल  करायचे ठरवले कारण त्यांना या अश्या गोष्टी खूप चांगल्या महिती होत्या या गोष्टीचं ज्ञान त्याना खूप होत त्यामुळे मी त्यांना सकाळीच फोन केला
' hallo बाबा
'जावईबापू तुम्ही बोल की काय म्हणता खूप दिवसांनी आठवण काढलीत '
' बाबा मी खूप प्रॉब्लम मध्ये आहे हो
काय झालं जावईबापू काही सांगा तर आधी आणी तुम्ही रडताय का ? काय झालय ?

मग मी त्यांना आत्तापर्यंत जे काही घडलंय ते सगळं सांगितल

' जावईबापू मी लगेच तिकडं यायला नीघतोय
तुम्ही घाबरू नका पण मी येत नही तोपर्यंंत तुम्ही ती खोली उघडू नका
आणी एवढं बोलून त्यांनी फोन कट केला आणी मग ते तिथून निघाले
येताना त्यांच्या मनात एकच विचार येत होता,
कि हे जे काही घडत आहे त्याचा सामना करायचा तो कसा?
 त्या घरात काय आहे हे त्यांना पूर्णपणे जाणून घ्यायचं होत
ते त्या गावात आल्यावर त्यांनी त्या घराच्या इतिहासाची माहिती घ्यायला सुरवात केली.
त्यांना त्या घराची आता बरीच माहिती मिळाली होती

त्या घरात एक कुटुंब राहत होत.
पती पत्नी आणि त्यांची एक मुलगी. एवढं त्यांचे कुटुंब.

एकटी  बाई धुनी-भांडी करून घर चालवायची तिचा नवरा दारू पिऊन इकडे-तिकडे पडलेला असायचा .
तीच नाव दामिनी . दामिनी  बिचारी याच्या-त्याच्या घरी कष्ट करायची आणि हा रात्री पिऊन घरी जाऊन तिला पैशासाठी मारहाण करीत ती दामिनी तिच्या नवऱ्याच्या त्रासाला खूप कंटाळली होती . रोजचंच ते दिवसभर लोकांच्या घरी काम करायचं आणि रात्री नवऱ्याचा मार खायचा . तिला आता हे खूप असहाय्य होत चाललं होत
आज तुम्ही परत पिऊन आलात , अहो का छळताय आम्हाला आम्हाला सुखाने जगू तरी द्या
पण तिच्या बोलण्याचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नव्हता
तिच्या डोळ्यातल्या पाण्याची त्याला जराही चिंता राहिलेली नव्हती तो त्याच्याच पिण्याच्या गुंगीत मग्न होता
त्याने खिशातून दारूची बाटली काढली आणि ग्लासात ओतून पिऊ लागला
त्याची चार वर्षाची मुलगी गौरी एका कोपऱ्यात बघून फक्त बघत होती तिलाही वाटत असावं कि सांगावं बाबांना 'बाबा नका पिऊ हो दारू ' पण तिची त्यांच्या बद्दलची वाढत चाललेली भीती तिच्या आणि तिच्या बाबा मध्ये एक खोल दरी निर्माण करून गेली होती त्यामुळे ती फक्त बघत बसण्याखेरीज काहीच करू शकत नव्हती
आणि थोड्याच वेळात व्हायचा तो गोंधळ पुन्हा सुरु झाला.  तो माणूस दारू पिऊन परत त्या बाईला मारू लागला दारूच्या नशेत तो इतका वेडा झाला कि ती एक बाई आहे हे सुद्धा तो विसरला तिला लाथेने बुक्य्याने जे हातात येईल त्याने मारू लागला कोपऱ्यात बसलेल्या गौरीच्या डोळ्यातलं पाणी घळाघळा वाहत चेहऱ्यावरून जमिनीवर पडत होते .
तिच्या आईला तिचे बाबा मारतायत हे बघून ती आईला वाचवावे म्हणून त्यांच्या दिशेने जाऊ लागली
'बाबा सोडा आईला तिला नका मारू'
'बाबा सोडा '
तीन त्यांचा हात धरला पण रागाच्या भरात त्यानं तिचा हाताला एक हिसका दिला आणि तिला भिंतीकाढे ढकलून दिल त्यासरशी ती भिंतीला जाऊन धडकली आणि खाली पडली
पण तरीही तिच्या आईला वाचवायचा केविलवाणा प्रयत्न ती करत होती
ती उठून उभा राहिली आणि परत तिच्या आईच्या दिशेने चालू लागली पण चालता चालता तिच्या पायाने चुकून तिच्या बाबाची दारूची बाटली सांडली
आणि इथेच घात झाला तिच्या बाबाने ती सांडलेली  बाटली पहिली त्याचा राग आता त्याला अनावर झाला त्याने तिला पकडले आणि उचलून भिंतीवर फेकले ती चार वर्षाची मुलगी एका बाहुली प्रमाणे फेकली गेली तिची आई तिला वाचवायला मध्ये आली पण तिलाही त्याने जमिनीवर जोरात आपटलं तिच्या डोक्याला मार लागला तिच्या डोळ्यासमोर अंधार यायला लागला .ती बघत होती तिचे बाबा तिला धरून मारत होते शेवटी त्यांनी तिचा गळा पकडला आणि वर उचललं तिच्या आईची तिला वाचवायची धडपड पण व्यर्थ .
त्याने तिला गळ्याला धरून वर उचलले . तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला ती सुटण्यासाठी धडपड करू लागली पण तो तिला सोडत नव्हता दारूच्या नशेत तो विसरला होता कि ती त्याची मुलगी आहे आणि तो त्याच्याच मुलीचा जीव घेत होता काही वेळ  त्यानं तसच गौरीला उचलून धरलं तिची आई रडत होती तिच्यात आता उठाण्याची हि ताकत उरली नव्हती ती फक्त बघत होती आणि रडत होती शेवटी काही वेळाने गौरीची ती धडपड एका मोठ्या किंकाळीं निशी बंद झाली . गौरीची  हलचाल बंद झाली होती  गौरीचा तिच्याच बापाकडून दारूच्या नशेत खून झाला होता .
मरणा अगोदर तीन विचार केला असेल 'आई जाते ग तुझ्याशी शेवटचे काही शब्द बोलायचे होते पण ते हि माझा गळा दाबल्यामुळे शक्य झाले नाहीत पण आई एव्हडे नक्की सांगेन कि पुढच्या जन्मी पण मी तुझीच मुलगी म्हणून जन्माला येईल, तू तुझी काळजी घे माझं जीवन देवाने इथपर्यंतच लिहिलं होत, पण तू माझी आठवण काढून रडत बसू नकोस आणि बाबांना सांग पुढच्या जन्मी तरी मला असा मारू नका आई माझ्याच नशिबी असा का ग मी कधी बाबांना कापड्यासाठी हट्ट केला नाही कि कधी खेळणी मागितली नाही मग का पण आता विचार करायची वेळ निघून गेलेली आहे आई जाते ग काळजी घे '
पण हे शब्द बोलायचे तिच्या मनातच राहिले तीच खाली पडलेलं ते निर्जीव शरीर बघून दामीनीच  काळीज फाटत होत तिच्या पोटाच्या गोळ्यांचा हा असा अंत होईल तिला कधी असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं गौरीच शरीर बघून तिच्या अंगात एका आईची शक्ती संचारल्यासारखी ती उठली तिचा नवरा ती बाटलीत जी थोडीशी दारू शिल्लक होती ती पीत होता . तीन गौरीच्या प्रेताकडं बघितलं आणि तिथं बाजूलाच असलेला वरवंटा उचलला आणि तिच्या नवर्याच्या डोक्यात मारायचं चालू केलं ती एका मागून एक वार त्याच्या डोक्यावर करत होती. तो संपला होता पण एका आईच मन अजून शांत झालेलं नव्हतं ती त्याला मारत होती तो मेल्याची खात्री पटल्यावर रडत रडत तिने तो वरवंटा बाजूला फेकला आणि तिच्या मुलीपाशी गेली आणि गौरीच्या प्रेतावर ती डोकं ठेऊन ती रडू लागली ती थोडा वेळ तिच्या आठवणीत रमली आणि आता सगळं संपलय हे बघून ती उठली आणि तिने घरातच वर साडी बांधून गळफास घेऊन दमीनीनेही  आत्महत्या केली

हि सगळी कथा ऐकल्यावर रिंकीच्या आजोबांना हळू हळू सगळं समजायला लागलं ज्या दिवशी गौरी चा खून झाला त्याच  दिवशी रिंकी जन्माला आली म्हणजे गौरीच रिंकी आहे हे समजायला त्यांना वेळ लागला नाही
गौरीच रिंकीच्या रूपात पुनर्जन्म झालाय आणि म्हणूनच दामिनी तिला तिची मुलगी समजून तिच्याबरोबर घेऊन जायला आली आहे
जोपर्यंत तीन रिंकीच्या पाहिलेलं नव्हतं तोपर्यंत काही नाही पण रिंकी त्या घरात राहायला गेली त्यावेळेस तीन रिंकीच्या पाहिलं आणि ती समजून गेली कि हीच गौरी आहे
म्हणजे ती आता रिंकेला घेऊन जाणार आहे
रिँकिचा जीव धोक्यात आहे
'मला आता लवकरात लवकर तिथं गेलं पाहिजे नाहीतर रिंकीच काहीही बरेवाईट होऊ शकत '
असा विचार करून ते लवकरात लवकर तिथून निघाले

पुनर्जन्म Punrjanm marathi horror story by somnath kale part 1

'पुनर्जन्म '
By
Somnath kale
' रिंकि ' हळुच पडशील.  नाही बाबा माझी मुलगी रिंकि. तीन वर्षाची आहे. सहा महिन्यापूर्वी तिची आई वारली. आज आम्ही नवीन घरात रहायला आलोय रिंकिला हे घर खूप आवडलं आहे. ती खूप खुश आहे.  हेच कारण  होतं घर बदलण्याचं त्या घरात रिंकिला तिच्या आईची खूप आठवण यायची त्यामुळे आम्ही ते घर बदललं. या घरात आता मी आणी माझी मुलगी रिंकि दोघेच आहोत.
पुनर्जन्म by somnath kale


सगळं काही सुरळीत चाललं होतं. माझी मुलगी ही हळू हळू तिच्या आईच्या आठवणीतून बाहेर येत होती.
एके दिवशी
बाबा ती रूम बंद का आहे ? आपण बघायची का उघडून ?  हो बघू आपण उघडून,  मी येतो चाव्या घेऊन. आणी रिँकिचे बाबा चावी आणायला गेले आणी ते लगेच चाव्या घेऊन आले. त्यांनी सगळ्या चाव्या लाऊन बघितल्या पण एकही चावी त्या रूमची नव्हती. बाबा आता ?  बघतो मी नवीन चावी बनवावी लागेल.
रिंकिला खूप ईच्छा होती त्या रूम मधे काय आहे हे बघायची त्यामुळे मी नविन  चावी बनवून आणली. आणि मग मी आणि रिंकि ती रूम उघडायला गेलो. मी ती रूम उघडली आणी आम्ही आत गेलो. त्या खोलीत खूप धूळ होती बहुतेक बरीच वर्षे ती खोली बंद असावी.

त्या खोलीत एक बेड, दोन पत्र्याच्या पेट्या, एक आरसा होता मोठा काही पेंटिंग्ज होत्या जे होतं ते सगळं धुळीने माखलेलं होतं ' बाबा आपण ही रूम स्वच्छ करुयात '  मग आम्ही ती रूम साफ करायच काम चालू केलं. माहीत नाही का पण मला त्या खोलीत खूप विचित्र वाटत होत. असं वाटत होत जसं की माझा जीव गुदमरतोय. काळीज धडधडत होत.  पण नंतर मी विचार केला की ही रूम खूप दिवस बंद होती त्यामुळे इथे थोडसं अशुद्ध वातावरण निर्माण झालं असेल आणी आम्ही रूम पुसायला सुरुवात केली
त्या पेंटींग्ज पुसल्या तो आरसा ही पुसून स्वच्छ केला
मला रिंकिला बघून खूप आनंद होत होता. ती आता खूप खुश दिसत होती मला रिंकिला असच बघायची इच्छा होती,
आम्ही सगळं साफ केल्यावर त्या पत्र्याच्या पेट्याकडे वळलो
पहिली पेटी मी उघडली तिच्यात काहीच नव्हतं ती पेटी पूर्णपणे मोकळी होती मग मी दुसरी पेटी उघडायला गेलो मी ती पेटी उघडणार इतक्यात माझं लक्ष त्या आरश्यावर गेलं त्यावर काहीतरी लाल पदार्थ खाली ओघळत होता
आम्ही तर हा आरसा आत्ताच साफ केला होता मग हे परत काय पडलय ते बघायला मी आरश्याजवळ गेलो' मी बघितले तर ते रक्त होत पण कुणाचं मला काहीच कळत नव्हतं काय होतय ते . मला राहून राहून असं वाटत होत की मी ही रूम उघडून कही चूक तर केली नाही ना?
मी मागे वळून बघितल तर रिंकि ती पेटी उघडत होती तिनं ती पेटी उघडली आणी काही कळायच्या आत रिंकि जमिनीवर पडली मी पळत रिंकि जवळ गेलो रिंकि जमिनीवर पडलेली होती मी पेटीत बघितल तर त्यात फक्त एक बाहुली होती
मला आता अस जाणवायला लागलं होतं की रूम मध्ये काहीतरी वेगळ घडतय मला जाणवत होत की आम्हां दोघां व्यतिरिक्त सुध्दा रूम मध्ये कोणीतरी आहे
मी तशाच अवस्थेत रिंकिला उचलल आणि बाहेर घेऊन आलो रिँकिच्या तोंडावर पाणी शिम्पडले पण तो प्रयत्न ही व्यर्थ. रिंकि वर उठत नव्हती आता मात्र मी खूप घाबरलो काय झालं असेल मझ्या रिंकि ला
मी खूप घाबरलो होतो कारण माझ मन आता एका पुरुषाचं  नसून एका बापाचं होत
मी लगेच तिला हॉस्पिटल मध्ये घेऊन गेलो

' डॉक्टर ...डॉक्टर ... डॉक्टर ...
काय झालय ,
माझी मुलगी बघा कशी शांत पडलीये हो हिला बघा ना काय झालय ते
मझ्या डोळ्यातून येणारं पाणी डॉक्टरानि बघीतल
त्यांनी लगेच नर्स ला बोलावले आणी रिंकिला अड्मिट करून घेतले

मी काय करू मला काहीच कळत नव्हत
माझ्या मनात हाच प्रश्न निर्माण व्हायचा की
' रिँकिच्या या अवस्थेला मीच तर जबाबदार नही ना? '

सुमारे एक तासाने डॉक्टर माझ्याकडे आले
तुमची मुलगी आता ठीक आहे काळजी करण्याचं काहीही करण नाहीये She is All Right
धन्यावाद डॉक्टर साहेब तुमचे फार फार उपकार झाले
अहो उपकार कसले हेच तर आमच काम आहे
नाही तरी पण thank you.
पण कशामुळे झालं होतं तिला असं कही कळू शकेल
तुमची मुलगी जास्त धुळीच्या ठिकाणी गेल्यामुळे तिला श्वास घ्यायला प्रॉब्लम झाला आणि त्यामुळेच ती बेशुध्द झाली होती
पण आता ती ठीक आहे तुम्ही तिला घेऊन जाऊ शकता
धन्यवाद डॉक्टर

रिँकिचे बाबा तिला घरी घेऊन आले,
त्या घटनेनंतर त्यांना रिँकित प्रचंड मोठा बदल जाणवायला लागला. पहिले हसत खेळत राहणारी रिंकि आता एकदम शांत राहू लागली होती. ती माझ्याशी लवकर काही बोलत पण नव्हती. ती तिच्याच विचारात गुंतलेली असायची. ती वेळेवर जेवनही करत नव्हती
एके रात्री रिंकि आणि तिचे बाबा झोपलेले असताना, अचानक रिंकि उठून उभी राहिली आणी दरवाजाच्या दिशेने जाऊ लागली रिंकि चालत चालत त्याच खोलीत आली जी त्यांनी साफ केली होती आणी रिंकि त्या आरशासमोर जाऊन बसली. तिच्या बाबांना तितक्यात जाग आली आणी ते उठून बघतात तर रिंकि जागेवर नाही. आता ते खूपच घाबरले. उठून सैरावैरा घरात  बाहेर रिंकिला शोधु लगले पण रिंकि काही सापडेना मग शेवटी त्यांनी ती बंद रूम बघून यावी म्हणून ते त्या रूम मध्ये गेले तर रिंकि तिथेच त्या आरश्यात बघत बसली होती
रिंकि! रिंकि तू इथे काय करतेय,
आणि कशाला आलीस इथं
बाबा मी नाही आले, मला या घेऊन आल्या
कोण घेऊन आलं तुला,
रिँकिने आरशात दाखवलं तर आरशात रिँकिच्या चेहऱ्या ऐवजी एका भयानक बाईचा चेहरा मला दिसला तिचा तो चेहरा आणी त्यावरच ते भयानक स्मित हास्य बघून माझी तर बोलतीच बंद झाली त्या रूम मध्ये सर्वत्र तिच्या भयानक हस्यचा आवाज घुमू लागला.
' मी हिला घेऊन जाणार माझ्याबरोबर '
मी नही सोडणार
कुणालाच नही सोडणार '
क्रमश:

रक्तपिशाच्च Sanjay kamble raktpishaachya Part-3

अंग
घामान भिजलेल. डोळ्यात मरणाची भिती अगदी स्पष्ट झळकत होती तर जिवंत रहावे
यासाठी धाव घेत होते. झेपा टाकत या सगळ्यातुन दुर दुुर आणखी दुर जायच होत.....
जंगलातील त्या चिंचोळ्या पायवाटेने धावताना एकमेकांचा तोल सावरत ते धावत
सुटले... काट्या कुट्यातुन आपला जिव वाचवण्यासाठी इथुन बाहेर पडायच होत.. पुढे
असलेल गणपत चा तोल गेला तसा शिरपा न झटकन त्याचा हात पकडुन वर उचलला तसा
सर्वानी पुन्हा वेग धरला... इतक्यात सर्वात मागे असलेला शिरपा वाटेत पाय घसरून
पडला.. उतारावरून तसाच गडगडत तो खाली आला. तशी बाजुच्या झाडावर बसलेले एक घुबड
पंखाची फडफड करत आकाशात झेपावले... अंगावर ठिकठीकाणी खरचटलेल आणी पायातुन
रक्तही येत होत... वेदनेण कळवळतच त्यान आपल्या मित्रांना साद द्यायला तोंड
उघडल होतच की कोणीतरी मागुन त्याच तोंड गच्च दाबुन धरल... एक काळकुट्ट
अस्थिपंजर मनगट ज्यावरुन कातड ओघळून पडत होत... मांस सडल्याचा वास त्या
हातातुन येत होता... शिरपाचा श्वास गुदमरत चालला...
त्याच्या पुढे असलेले सोबती धावतच होते.... मागे काय झालय कोणालाच कल्पना
नव्हती.. काही वेळातच त्यांच्या पावलांचा आवाज दुर दुर जात येईनासा झाला तशी
सर्वत्र एक जीवघेणी शांतता पसरली...
Raktpishaachya

त्या पकडीतुन सुटण्याची हात पाय आपटत तो स्वता:ला सोडवण्याची धडपड करु लागला
पन व्यर्थ ... झटापटीत तो पालथा झाला आणी कोणीतरी त्याच्या पाठीवर बसुन त्याच
तोंड आवळत होत... अंगातील सारी शक्ति एकवटुन त्यान जोराचा हिसडा देत मागे
फिरला आणी सुन्न झाला... त्या जागेवर तो एकटाच होता.. काही वेळापुर्वी कोणीतरी
घट्ट आवळुनमागे कोणीच नव्हत... त्याला आश्चर्य वाटल आणी त्याहुन जास्त भिती...
जमिनीवर पडलेल्या शिरपान पायाची हलचाल करताच एक जोराची कळ पायातुन उमटत
मेंदुपर्यंन्त पोहचली... त्याचा पाय दगडात अडकल्यान मोठी दुखापत झालेली...
स्वताच्या हातानीच तोंड दाबुन धरत कळ सहन करू लागला तोच त्याला आपल्या
आजुबाजुला कोणीतरी आहे याची जाणीव झाली... कोणीतरी होत जे दिसत नव्हत पन ते
आपल्यावर नजर रोखुन होत...
इकडे शिरपा भितीन थरथर कापत होता... वाळलेल्या पानांमधुन होणारी सळसळ त्याच्या
दिशेन कोणीतरी येत असल्याच भासत होत.. शिरपा देवाचा धावा करत या संकटातुन
सोडवण्यासाठी प्रार्थना करू लागला..सर्व काही शांत झाल तशी पुन्हा एक जिवघेणी
शांतता पसरली.. फक्त रातकिड्यांचा किर्रर्रर्रर्रर्र किर्रर्रर्रर्रर्र आवाज
कानात घुमत होता... जागेवरून हालता येत नव्हत पन शिरपा आजुबाजूच्या परिसरीतील
प्रत्येक गुढ हलचाल कान देऊन ऐकत होता... काही वेळातच रातकिड्यांचा आवाजही
थंडावला आणी आकाशातील चांदणही काळ्याभोर ढगांनी झाकल जाऊ लागल तशी त्याच्या
काळजाची धडधड वाढली.. लख्ख काळोखान आकाश व्यापुन टाकल आणी दुर कुठेतरी
कोल्हेकुई झाली... खाली पडलेला शिरपा बाजुच्या जंगलात आपली नजर रोखुन
बसलेला... त्याला कळुन चुकल होत क आता तो एकटा नव्हता...मागुन कोणीतरी सावकाश
त्याच्या दिशेन सरकत होत.. काळोख असल्यान काही दिसत नसल तरी जंगलातील
वाळलेल्या पानांवरून काहीतरी सरपटत येत होत... त्याच्या अंगावर सरसरून काटा
येऊ लागला ... अंग घामान भिजल होत... मागे वळुन बघण्याच धाडस होत नव्हत पन न
रहाऊन त्यान मागे पाहील.. त्याची भेदरलेली नजर मागे अचानक एका ठिकानी
स्थिरावली... त्याला एक फिक्कट पांढरी मानवी आकृती दिसली आणी क्षणात पुन्हा
नाहीशी झाली... शिरपाला समजुन चुकल की हे काहीतरी विचित्र आहे. आपन स्वताहुन
एका सैतानाच्या जबड्यात चालुन आलोय आणी इथुन जीवंतपणी सुटका होईल अस वाटत नाही
... ती अमानवीय शक्ति त्याच्यावर नजर रोखुनच असावी कारण एखादाही जंगली प्राणी
त्या परिसरात भटकत नव्हता.. त्या लख्ख काळोखात त्यान आपली व्याकुळ भेदरलेली
नजर फिरवायला सुरवात केली.. तोच मागुन ज्या वाटेने तो धावत आला होता त्या
वाटेवरून कोणीतरी वेगात धावत येत होत... तसा शिरपाचा धीर सुटत चालला... त्यान
आपला पाय त्या दगडातुन सोडवण्याची धडपड सुरू केली... डोळ्यातुन घळाघळा पाणी
येऊ लागल.. वेदना असह्य झाल्या पन पर्याय नव्हता कारण कोणीतरी झपाझप पावल
टाकत, वेगाने धावत येत होत... वाळलेल्या पालापाचोळ्यातुन सळसळ करणारा आवाज
काळजाचा थरकाप उडवत होता... ढग पुढे सरकले तसे चंद्राच्या प्रकाशात तो परिसर
उजळुन निघाला ... शिरपान देवाचा धावा सुरू केला "'देवा...सोडव गा... देवा सोडव
गा..." त्याच्या तोंडातुन बाहेर पडणारे शब्द ही अडखळत होते.. पाय सोडवण्याचा
प्रयत्न करत त्यान माग पाहील.... आणी त्याची बोबडीच वळली... एक आठ दहा फुट
उंच, काळाकुट्ट माणुस आपल्या भरड्या आवाजात ओरडत, किंचाळत त्याच्या दिशेन धावत
येत होत... पंढरे विस्फारलेले डोळे शिरपावर रोखुन धरले होते तर जबडा एखाद्या
अजगरा सारखा पुर्णपणे फासटल्याने निघणारी हिरव्या रंगाची लाळ छातीवर पसरली
होती तर त्याचे आत वळलेले त्याचे सुळे आणखी भिषण वाटत होते... त्याचा डावा हात
खांद्यापासुन तुटलेला तर उजव्या हातात रक्तान माखलेल एक लांब धारधार हत्यार
होत.. आपल्या दिशेने झेपावणार ते आक्राळ विक्राळ पिशाच्च पाहुन मनातुन पुरता
घाबरलेला शिरपाची दातखिळीच बसली... बेंबीच्या देठापासुन एक आर्त किंकाळी
शिरपाच्या तोंडुन बाहेर पडली आणी त्या पिशाच्च्याने त्या अंगावर झेप टाकली तसे
झाडावर बसलेले घुबड पंखांची फडफड करत त्या जागेवर घिरट्या घालु लागले... काही
क्षणात शिरपाच्या देहाची हलचाल थंडावली आणी त्या पिशाच्च्याने आकाशातील
चंद्राकडे पहात एक जोरची आरोळी ठोकली तसे पुन्हा चंद्राची कोर काळ्याकुट्ट
ढगांनी व्यापली गेली...
*****
इकडे गणपत हानमा आणी भिकाजी धावत खुप दुर आले... सुटकेचा निश्वास टाकत एका
ठिकाणी बसले
जमिनीवर आडवा होत हानमा म्हणाला.."सुटलो एकदाचे..."
तसा भिकाजी गंभीर झाला.. तो दबक्या आवाजात म्हणाला..." आजुन आपली सुटका झालेली
न्हाय... सुटका झाली असती तर ती हडळ जोरात किचळुन म्हणाली असती ' 'चुकलासा'...
आजुन तीची हद्द सपलेली न्हाय.."
एवढ बोलुन भिकाजी मागे फिरला आणी घबरून म्हणाला...
"शिरपा कुट -हायला र.."
भिकाजीच्या प्रश्नाला कोणी कडेच उत्तर नव्हत... सर्वच घाबरले... कारण त्यांचा
मित्र त्यांच्या सोबत नव्हता ..
" त्याला शोधाया हव.."
हानमा देखील उठला... पन गणपत तसाच बसुन होता...
" गणप्या... तु नाहाय यणार..."
हानमाच्या प्रश्नाला त्यान काहीच उत्तर दिल नाही... "ये भित्र्या.... लेका हीच
का दोस्ती...."हानमा थोडा रागातच होता
गणपत च्या चेह-यावरचा रंग मात्र उडाला होता... काळीज जोरजोरात धडधडत होते तर
भितीने तोंडातुन शब्दच बाहेर पडेनासे झाले...
" गणप्या.... ये गणप्या... काय झाला.... आर बोल की..." भिकाजी त्याला धीर देत
विचारू लागला पन त्याला काहीच बोलता येईना... आपला उजवा हात पुढे करत खुणावल
तसे भिकाजी आणी हानमा पाहु लागले..
आणी तीघेही हतबल झाल्यासारखे मटकन खाली बसले..
समोर तीच झोपडी होती... जिथुन सुटका होण्यासाठी ते धावत होते... आणी छतावर ती
म्हातारी ऊभी होती...पांढ-या केसांनी चेहरा झाकलेला मान किंचीत तीरकी करून ती
त्याना रखरखत्या नजरेने पहात होती ....
" चकव्यान आपला घात केला र..." एवढेच शब्द भिकाजीच्या तोंडुन बाहेर पडले...
आणी त्यान मागे पाहील तर त्या चिंचोळ्या पायवाटेवर कोणीतरी उभ होत..... आठ ते
दहा फुट उंच.. डावा हात तुटलेला... आणी रखरखती पांढरी बुबळ त्यान आपल्या
सावजावर रोखलेली, पन जस ते गुलाम होत त्या झोपडीतल्या वृद्धेच , नव्हे ,
त्या चेटकीणीच, आणी ते संम्मती मागत होत, झडप घालण्याची.. बाजुच्या
झाडावर बसलेल घुबड खाली चाललेल
भयान नाट्य मोठ्या डोळ्यांनी पहात होत..  भयभीत झालेल्या त्या तीघांकड
पहात त्या चेटणीनीच एक आर्त किंकाळीसारख भेसुर हास्य आसमंतात घुमल तसे ते
घुबड आपल्या पंखांची फडफड करते झप्पकन पुन्हा आकाशात झेपावले.....
 आपला जीव वाचवण्यासाठी जो तो वाट दिसेल तीकड धावत सुटला, वेगवेळ्या
दिशांना, जिवाच्या आकांतान, पन मागुन एेकु येत होत्या एकापाठोपाठ एक
भेसुर किंकाळ्या, आणी त्या किंकाळंयानी आरोळ्यांनी आसमंत हादरत राहीला,
रात्र गडद्द आणखी गडद्द होत भीषण झाली त्या गुढ रात्रीच्या गही-या
अंधारात सारे वाटसरू कायमचे हरवुन गेले,
*****
काही दिवसांनी...
डोंगराच्या उताराला वसलेल एक गाव रात्रिच्या कवेत शांतपने झोपी गेलेल,
गावच्या कच्च्या रस्त्यावरून गावठी कुत्र्यांचा झुंड धावत अचानक भुंकत
सुटायचा,
 दुर कुठेतरी जंगलात कोल्हेकुई झाली तशी दिव्याच्या अंधारात  अभ्यास
करणा-या मुलीकड पहीत विमल बोलु लागली
" किती दा सांगीतल रात व्हायच्या आत घराकड येत जा म्हणुन ...." ती रागातच होती.
" आई... येत आसल ग बा... कशापायी बडबड करतीयास..."
" तु गप ग... आकरा वाजुन गेल्याती , दारू पिऊन पडल आसल कुठतर.. तु झोप
म्या जागते.."
आईन आपल्या पोरीच्या डोक्यावरून हात फिरवला तशी ती ही अंथरूणावर पडली आणी
दरवाजावर थाप ऐकु आली...
" आलत बघ
"
म्हणतच ती जागेवरून उठली , लाकडी कुडाचा दरवाजा कर्रर्रर्रर्रर
कर्रर्रर्रर्रर करत बाजुला केला आणी समोर पाहील , पन बाहेर तीचा नवरा
शांतपने उभा होता, अंग घामान भिजलेल, जणु धापा टाकत तो आला होता.. पन आत
न येता तो बाहेरून आपल्या बायकोला म्हणाला,...
"दरवाजा बंद करून घे.. कुणीबी भाईर पडु नगा.... उंबारा वलांडुन भाईर पडु नगा.."
" आव काय झाल...? " विमल घाबरली, पन तो पुढ काही बोलणार तोच त्याच्या
चेह-यामागुन दुसरी एक काळीकुट्ट आकृति डोकावुन तीला पाहु लागली, आणी त्या
दृष्यान विमल भोवळ येऊन जागेवरच कोसळली...
मानवी रक्ताची
चटक लागलेली ती चेटकीन आणी तीच गुलाम पिशाच्च आता जंगलातुन मणुष्य वस्तीत
फिरू लागलय. अंधारातुन गही-या काळोखातुन....
 दरवाजावर ऐकु येणारी ती थाप.... कदाचीत पुढच भक्ष
....?
समाप्त.
Story by sanjay kamble

रक्तपिशाच्च Sanjay kamble raktpishaachya part-2

चुलीवर यवड तांदुळ शिजवुन आमास्नी खायाला दे.. मजे आंगात वाइस ताकत यईल...आजनं
रस्ता लय दुर हाय."
त्या म्हातारीने तांदुळ घेतले आणी चौघांकडे एक कटाक्ष टाकला, तसा हानमा
म्हाणाला
Raktpishaachya

"अग म्हातारे, खरच किती घाबरतीयास जीवाला.. जरा पाणी दे ... "
ती काहीच न बोलता झोपडीत मागे फिरली आणी प्यायला पाणी देऊन झोपडीत परतली..
चौघेही बाहेरच्या अंगणात विश्रांतीसाठी आडवे झाले .. शुभ्र टपोर चांदण
झाडांच्या पानावर सांडलेल, अगदी त्या झोपडीबाहेर शेणान सारवलेल्या अंगणात
चांदण्याचा सडा पसरलेला... आणी भिकाजी आणी शिरपा गप्पा मारण्यात गुंग होते तर
एव्हान हानमा चा डोळा लागलेला पन गणपत च्या पोटात मात्र भुकेने गोळा उठत
होता..
        बराच वेळ झाला पन आजी बाहेर आली नव्हती..  न रहाऊन गणपत उठला आणी भात
शिजला का ते पहायला निघाला... त्यान कवाडाच्या फटीतुन आत पाहील तर जुने पुराने
कपडे दोरीवर लटकत होते. कोप-यात एक जिर्ण आणी ठिकठीकानी छिद्र पडलेली लाकडी
पेटी होती त्या छिद्रातुन ऊंदीर बिनदीक्कीत ये जा करत होते...
अंगणात बसलेला शिरपा लांबुन गणपत ला अस आत डोकावुन पहाताना न्याहाळत होता. पन
काही न बोलता तो गणपतच्या हलचालींवर नजर ठेवत होता.. अचानक आत पहाता पहाता
गणपत खाली कोसळला... टाचा घासत रांगत तो मागे मागे सरकण्याची केवीलवाणी धडपड
करू लागला. तसा भिकाजी धावत त्याच्या जवळ गेला . गणपत ला ऊठवण्याचा प्रयत्न
करू लागला पण त्याला जागेवरून उठता येत नव्हत... डोळ्यात जबर भिती दाटलेली तर
दातखिळी बसल्याने तोंडातुन शब्द फुटत नव्हते. तो वारंवार त्या कवाडाकडे बोट
करत मागे मागे सरकत होता.. शिरपा न गणपतच्या कमरेत हात घातला आणी उभ करुन
अंगणात नेल पन अजुनही त्याची वाचा गेली होती..
भिकाजी हळुच त्या कवाडापशी गेला आणी आत डोकाऊन पाहील तसा त्याच्याही चेह-याचा
रंग उडाला. क्षणात त्याचा घसा कोरडा पडला... अंग घामान भिजल आणी काळीज छाती
फाडुन बाहेर पडते की काय अस धडधडु लागल... त्याची नजर आत एके ठिकानी स्थिरावली
होती.. चुलीवर एका काळ्या मळकट भांड्यामधे भात रटरट आवाज करत उकळत होता. ती
म्हातारी चुली शेजारीच बसलेली. काळे पांढरे मोकळे सोडलेले केस पाठीवर पसरलेले
होते. आपल्या सुरकुतलेल्या हाताच्या लांबसर बोटांनी चुलीच्या मागे ठेवलेला
दिवा तीनेे उचलुन त्याच्या पिवळसर प्रकाशात उकळत असलेला भात पाहीला.. तो भात
पहाताना दिव्याच्या प्रकाशात तीचा अर्धवट सुरकुतलेला चेहरा आणी लांब बाकदार
नाक आणी बारीक पातळ ओठ खुपच भयान दिसत होत त्याहुन भयान तीचे मोठ विस्फारलेले
डोळे जे खोबण्यातुनही विद्रुप दिसत होते.. तीन आपली नजर तशीच त्या भांड्यात
रोखलेली , रटरटणा-या भाताच्या भांड्यातुन वाफा बाहेर पडतच होत्या  तीन आपला
उजवा हात त्या उकळत्या भांड्यात घातला तसा एक वाफेचा भपका वर उठला... त्या गरम
पोळणा-या भाताचा एक मुटका तोंडात टाकला.. तीच्या सुरकुतलेल्या हाताला
खोपरापर्यंत भाताची शिते चिकटली होती. म्हातारीन आपल्या हातावर डसलेली ती शिते
पाहीलीत आणी तोंडाचा जबडा हळुवारपणे उघडताच तोंडातुन काळीकुट्ट जीभ वळवळत
बाहेर आली आणी जसा बेडुक मटमट करत चिटपाखर जिभेने टीपतो तशी हातावरची शिते
जिभेने चटचट करत टीपु लागली..
भिकाजी डोळे विस्फारून हे पहात होता तोच पुढचे आक्रीत घडले. चुलीतील जाळ
वाढवण्यासाठी तीन आपले पाय त्या चुलीत सरकवले.. चर्रर्रर्रर्रर चर्रर्रर्रर
करत तीचे लाकडासारके पाय खाली पेटत होते तर वर त्या भांड्यात भात उसळु लागला
आणी भांड्यात हात घालुन ती खाऊ लागली....
हे अमानवीय दृष्य पाहुन कुणाच्याही काळजाची थरकाप उडाला असता...
आधीच थोडा भित्रा गणपत या दृष्यान पुरता हादरून गेला. शिरपान त्याच्या तोंडावर
पाणी मारल तशी त्याची वाचा आली. डोळ्यात, चेह-यावर दाटलेल्या भितीला दहशतीला
मोकळ करण्यासाठी त्यान जोराची आरोळी ठोकण्यासाठी तोंड उघडल तस भिकाजी न त्याच
तोंड दोन्ही हातानी दाबुन धरल..
"भिका.. त्याच ताँड का दाबुन धरलयास..आन गनप्या, काय झालय... यवडा का
भ्यालास...?"
शिरपाच्या या प्रश्नाला भिकाजीन दबक्या आवाजात उत्तर दील.
" सांगतो... पर आधी हीतन नीगायच बगा... शिरप्या त्या पिशव्या घे मी गनप्याला
सावरतो... या वाटन सरळ निगायच.. आनं एक.... माग वळायच न्हाय... (बाजुला पाहात
म्हणाला.) त्या हानम्याला उठीव.."
गणपत ला घेऊन भिकाजी झपाझप पावल टाकत निघाला तर पिशव्या खांद्यावर लावत शिरपा
दबक्या आवाजात हानमा ला उठवू लागला..
" ये हानम्या.. आरं ये... लेका उठ की..."
डोळ चोळतच हानमा जागा झाला..
" काय र....भात शिजला व्हय..."
" व्हय .. आणं सपला बी... आरं काय तरी इपरीत वाटतय , लवकर चल.."
क्षणाचाही विलंब न लावता चौघे समोरच्या वाटेने जंगलात जिवाच्या आकांताने धावत
सुटले, कोणी काहीच बोलत नव्हत , त्या किर्रर्रर्र वाटेने सर्व आपला जीव
वाचवायला धावत होते. ती झोपडी मागे मागे पडु लागली आणी दिसेनाशी झाली...
काट्याकुट्यातुन वाट काढत भिकाजी सर्वात पुढ होता, गणपत आणि हानमा ही घाबरट
मंडळी मधे तर धाडशी शिरपा सर्वात मागे होता. ही वाट कुठ जातेय हे कोणालाच ठाऊक
नव्हत ...  पन आपला जीव त्या सैतानाच्या हवाली करुन एक भयान क्रुर मरण कोणालाच
नको होत..
*****
बराच वेळ झाला तरी बाहेरची कसलीच हलचाल जाणवत नव्हती... झोपडीच लाकडी कवाड
बाजुला होताच कर्रर्रर्रर्र्रर कर्ररिरर्रर्र्र आवाज त्या निरव शांततेत घुमला
तशी आपल्या पांढ-या पडलेल्या भुवया आकसत ती म्हातारी बाहेर आली पन बाहेर कोणीच
दिसत नव्हत ... तीचा सुरकुतलेला चेहरा क्रुर होऊ लागला आणी  बाहेर कोणीच नाही
हे पाहुन ती चवताळुन उठली... आकाशाकडे पहात तीन एक कर्णर्कश्य हास्य केल तशी
झाडांवर उलटी लटकणा-या वटवाघळांचा एक मोठा झुंड आकाशात झेपावला... तीच भयंकर
हास्य दुरवर असुनही त्या निरव शांततेमुळ या चौघांच्या कानावर आल तसा
त्यांच्याही काळजाचा थरकाप उडाला...
        धावताना वाटेतील वाळलेला पाला पाचोळा पायाखाली येईल तसा त्याचा
सळसळनारा आवाज काळजात दाटलेली भीती आणखीनच दाट करत होता... त्यातच रात्रीच्या
त्या भिषण वातावरणात घुं घुं करत सुटलेला वारा जणु एखाद्या अमानवीय शक्तीच्या
आधिन असल्यासारखा त्या चौघांवर नजर ठेवत होता... पन आपला जीव वाचाव यासाठी
चौघा मित्रांची धडपड सुरू होती..  पुढ धावत होते पन कोणीतरी त्यांच्या मागे
येत होत ... तीतक्याच वेगाने धावत , पन त्याच्या पायांचा आवाज सामान्य वाटत
नव्हता. जस एखाद हिंस्त्र श्वापद चार ऐवजी आपल्या दोनच पायांवर चालत याव तसच
हे जाणवत होत... ते अगदी जवळ आल होत.. सर्वात मागे राहीलेल्या शिरपाला आपल्या
मागे असलेल्या त्या अमानविय ताकतीची जाणीव झाली होती.. पन मागे पाहुन चालणार
नव्हत. धावायच होत फक्त समोर दिसणा-या त्या पायवाटेवरून.. श्वास वाढलेला , अंग
घामान भिजलेल. डोळ्यात मरणाची भिती अगदी स्पष्ट झळकत होती 
क्रमशः
Next part
 story by sanjay kamble 

रक्तपिशाच्च Sanjay kamble raktpishaachya part-1

रक्तपिशाच्च...
sanjay kamble
           बुधवार असल्याने गावच्या आठवडी बाजारात नेहमीसारखाच गोंधळ, गडबड,
घाई सुुरू होती..
पहाव तीकड समोर मांडलेल्या हिरव्यागार पालेभाजा , लाल लाल टमाटे , काळी पांढरी
वांगी , शेवगा ,पालक, मेथी यांचा ढीग च्या ढीग दिसत होता...
लोक कधी नुसतच पहात पुढ सरकत होतीत तर कोणी 'भाव' विचारून 'भाव ' खात निघुन
जात होता...पहाव तीकडे आपापल साहीत्य विकण्यासाठी लोकांना साद घालणारे
विक्रेते दिसत होते..
त्यातच कडेवर लहान पोराला घेतलेली माय भाव विचारू लागली...
"वांगी कशी हायती ....? पोकळा कसा दिला .?"
सागळ्या माळव्याच दर विचारून घेतल पण काहीच पसंतीस पडत नव्हत.. तीच्या कडेवरच
पोरग मात्र बेकरीतल बटरांच पाकीट पाहीजे म्हणुन रडुन गोंधळ घालत होत...
" गप की कार्ट्या , आसल कुनाच्या आवलादीच झालईस..? एकद बगीतल की पायजे म्हंजे
पायजेच.."
Raktpishaachya

अस अस्सल गावराण शब्द उच्चारत एक धप्पाटा पाठीत घातल पुन्हा म्हणाली..
" जा तुज्या 'बा' कड.."
पोरग्याला खाली उतरवल तस ते धावतच त्याच्या वडलांकडे गेल पन भोंगा मात्र चालुच
होता...
इकड भिकाजी मात्र भाजीचा खप हवा तसा होईना म्हणुन जरा नाराजच होता. दुपार होता
होता शिरपाचे बोंबील ,मासळी , बांगडा संपत आलेले तर गणपाची आंबा फणसाची रास
देखील कमी झालेली, राहीले ते हानमा आणि भिकाजी यांच्या भाज्या मात्र अजुनही
फारशा खपत नव्हत्या ....जो तो भाव विचारून नाक मुरडत निघुन जाई..
'बाजार भोगाव' गावाच्या नावावरूनच समजत की आजुबाजूच्या कित्येक गावातील
लोकांच्या आर्थिक उलाढालीच केंद्र असाव...आणि होतच... कोल्हापुर शहराच्या
पश्चिमेस साधारण ३५ किमी अंतरावर उंच डोंगर दाट जंगल आणि वनराईने नटलेल गाव..
आजुबाजूच्या अनेक गावातील लोक आपल्या संसारूपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी या
ठिकाणी येत तर आपल साहित्य विक्रीसाठीही छोटे मोठे शेतकरी आणि व्यापारी ही येत
असत. त्यातच भिकाजी, हानमा , शिरपा आणी गणपत ही एकाच गावची चौकडी आपापल
साहीत्य विक्रीसाठी या ठिकाणी येऊन दिवसभरात झालेल्या मिळकतीतुन आपल्या
संसाराला लागणा-या चिजवस्तु घरी नेत... यांच गाव तस दुर होत पन एकमेकांची सोबत
असल्यान वाट कधी सरते ते लक्षात येत नसे.. आज ही ते दर आठवड्याप्रमाणे आपापल
साहीत्य घेऊन आले होते.
         सांज व्हायला आली तरी भिकाचा माळव्याचा ढीग काही उतरत नव्हता.
लोकांची ये जा कमी होऊ लागली.. पुरेसे पैसेही मिळाले नव्हते त्यामुळे पुढच्या
आठवड्याचा गुजारा कसा करायचा याचा विचारही त्याला पडलेला...
बाकी तीघांनी घरी परताण्या आधी लागणार साहीत्य खरेदी केल..
" आगा ये भिक्या.. रात व्हयाला आली.. निगायच का रात हीतच घालीवतुस..."
शिरपान हातातली पिशवी उचलत साद घातली..तसा भिकजी म्हणाला...
" थांब गा... भाजीच्या चार पेंड्या इकतो मग निगु.. तवर हे दुकानातल सामान घे..
"
पोरान लिहुन दिलेली चुरघळलेली पांढरी चीठ्ठी खिशातुन काढत शिरपाला कामाला
लावल...
भिकाजची भाजी विकता विकता चांगलाच वेळ झाल... आणी बाजारात लोकांची गर्दीही
नाहीशी झाली... जो तो आपापली शिल्लक राहीलेली भाजीची पोती , ठीक्की दुरड्या
डोक्यावर घेऊन परतीच्या मार्गाला लागला.
" हानम्या ... ते बग... त्या दुकानातल्या घड्याळात...साडेआट वाजुन गेल आजुन
वस्तीची गाडी कशी न्हाय आली गा.." भिकाच्या या प्रश्नाने हानमा आपल्या जवळची
पिशवी खांद्यावर घेत उत्तरला..
" लेका नीट बग..साडेआट न्हाय... साडेनव वाजल्याती.. तुज्यापाई एसटी बी
चुकली...वडाप बी गावना झालय...''
तोवर शिरपा आणि गणपत चालत समोरून आले. मान तीरकी करून तोंडातल्या पानाचा
पिचकारी बाजुला मारत म्हणाला
" आगा वडाप बी न्हाय.. चालतच जायाला लागणार..."
सुपारीचा खांड तोंडात टाकत पिशवी ऊजव्या खांद्याला अडकवत गणपत म्हणाला...
" आता कुनाची वाट बगायची...? चला ... वाटला लागू.."
दिवस भर विक्री करताना घडलेल्या मजेशीर गप्पा मारत चौघांचा पायी प्रवास सुरू
झाला.. त्याच गाव त्या ठिकाणाहून आठ ते नऊ किमी असेल पन गावच्या त्या रांगड्या
गड्यांना याची सवयच होती...
उन्हाळ्याचे दिवस ... आभाळ चांदण्यात न्हाऊन निघाल होत.. चंद्राची कोर आकाशात
बरीच वर आलेली... पौर्णिमा दोन चार दिवसांवर असेल अस नितळ चांदण पडलेल...
गावचा तो मुख्य रस्ता धरला तर पोहचायला बराच वेळ लागेल त्यामुळे त्यांनी
डोंगरातुन जाणारा दुसरा कच्चा रस्ता पकडला..
एक जाड लांब काठी आणी बाजाराच्या पिशव्या घेऊन त्या चिंचोळ्या पायवाटेवर
पसरलेला पाला पा़चोळ पायाखाली तुडलत चालताना कोल्हापुरी चपलांचा
कर्रर्रर्रर्रर कर्रर्रर्रर्रर असा आवाज चोहोबाजुने घुमत होता. चौघांच्या
गप्पा ऐन रंगात आल्या होत्या. त्यातच भिकाजीचा मजेशीर स्वभाव असल्याने एक
विनेदी किस्सा सांगितला तसे तीघेही पोट धरून हसु लागले... चालता चालता ते बरेच
दुर आले... भिकाजी ला काहीतरी वेगळेच जाणवले तसे हसत असणा-या आपल्या मित्रांना
गप्प रहाण्यास सांगुन जागेवर थांबला... सर्वच एकदम शांत झाले... शिरपा आणी
हानमा दोघ भिकाजीकड पहात हाताने खाणाखुणा करत काय झाल विचारू लागले तसा
हातानेच स्वताच्या काना कडे बोट दाखवत कसलासा आवाज ऐकण्याचा इशारा केला...
तीघांच्या गंभीर चेह-याकडे पहात गणपत मात्र भितीन अर्धा झाला... आता चौघेही
श्वास रोखुन ऐकु लागले... आजुबाजूच्या दाट झाडीतुन रातकिड्यांची
किर्रर्रर्रर्रर्र किर्रर्रर्रर्रर्र आणी घुंsssss घुंssss असा घोंघावणारा
वारा इतकाच आवाज येत होता. तीघेही गंभीरपने भिकाजीकडे पाहुन आजुबाजूच्या
परिसराकडे पाहु लागले. भिकाजीन त्या समोरच्या चिंचेळ्या पायवाटेकड पाहील.
"कोणीतरी आपल्या संग चालत यत आसल्यावाणी वाटतया र.."
भिकाजीच्या त्या वाक्याने तीघेही थोडे घाबरले..
" गड्या.. जंगली जनावर आसतील.. बीगी बीगी पाय उचला न्हायतर इपरीत व्हायच.."
त्यासरशी चौघही झपाझप पावल टाकु लागले..
दोन्ही बाजुला झाडांच्या आकृत्या वा-याच्या मंद झोक्याबरोबर हालत होतीत. शुभ्र
चांदण्यात उजळुन निघालेली ती वेडीवाकडी पायवाटेने एका गुढ रहस्याकडे घेऊन जात
असल्या सारख वाटत होत...
" ये शिरपा.. रस्ता चुकलाय का बगा की र.. कीती यळ झालाय पर आजुन बी कंच गाव
दिसना.. आणं भुक बी जोरात लागलीया."
चालुन चालुन सर्वच थकले होते. बाजुच्या एका दगडावर बसत शिरपा न हातातली पिशवी
खाली ठेवली तसे गणपत आणी हानमा त्यांच्या जवळ जाऊन बसले. भिकाजी मात्र तसाच
त्या वाटेवर ऊभा आजुबाजूला पाहू लागला.. त्याला दुरवरून निघणारी एक धुराची
पांढरट रेषा आकाशात वर वर सरकताना दिसली.
"गड्यांनो.. गाव तरी जवळ आल्यासारख वाटतय.."
म्हणतच तरातरा चालत थोडा वर गेला आणी आपल्या मित्रांना वर येण्यासाठी साद
घातली.. तीघेही डोंगरमाथ्यावर पोहोचले तसे भिकाजी पहात असलेल्या ठिकाणी पाहु
लागले. डोंगराच्या माथ्यावर अगदी तुरळक झाडे होती आणी तीथेच साधारण ५० ते ६०
पावलांवर एका छोटीशा झोपडीमधुन लुकलूकणारा दिव्याचा किंचीत प्रकाश बाजुच्या
खिडकीतुन दिसत होता.. झोपडीवर असलेल्या छोट्या धुराडीमधुन निघत असलेली धुराची
पांढरट रेषा मोकळ्या आकाशात उंच पसरत वेगवेगळ्या आकृत्या तयार करत होती...
भुकेने व्याकुळ झालेले चौघेही त्या झोपडीच्या दिशेने चालु लागले.. पायाखाली
सुकलेला पाला पाचोळा तुडवत चौघेही झोपडीजवळ पोहोचले, तीघे बाहेर छोट्याशा
अंगणात थांबले तर भिकाजी पुढे झाला, हातातल्या बटव्यातुन सुपारीच एक खांड
तोंडात टाकुन चघळत मान किंचीत उंच केली आणी कवाडा शेजारी हात ठेवत हाक दिली..
"कुणी हाय का घरात"
सर्वत्र निरव शांतता पसरली प्रत्येक जण आतुन काही प्रतीसाद येतो का हे श्वास
रोखुन ऐकत होते..
आणखी तीन चार हाका दिल्या तशी आत काहीतरी हलचाल होत असल्यासारख जाणवल..
खळखळणा-या बांगड्याचा आवाज जाणवला
"कोण हाय.."
आतुन ऐकु आलेले ते एका वयस्कर स्त्रीचे जड  मोजकेच शब्द आतुन कानावर पडले तसा
सर्वाना धीर आला..
आवाजावरून वयस्कर स्त्री असावी अस वाटत होत.. तीच्या प्रश्नाला भिकाजीने लगेच
उत्तर दिले
तसे हल्केच तीने कवाड बाजुला केले...तशी एक अतीशय वयस्कर वृध्द स्त्री समोर
उभी होती.. किंचीत पांढरे केस, अंगावर मळकटलेल नऊवारी लुगड, पांढरी सुरकुतलेली
त्वचा जी हाडांना पुर्णपणे चिकटलेली,
बाहेर पहात ती म्हातारी बोलु लागली.. डोळ्यांच्या खोलवर गेलेल्या खोबनीतुन
किलकील्या नजरेन पहात तीन विचारल
" तुमी चोर ,डाकु आसलासा तर माज्या घरात तुमास्नी कायबी गवसायच न्हाय."
"आमी चोर न्हाय ग म्हातारे.. वस्तीची गाडी चुकली म्हणुन चालत गावाला निगालोया.
हे घे.. (हातातल्या पिशवीत हात घालुन प्लास्टीक कागदात बंधलेले तांदुळ दीले )
चुलीवर यवड तांदुळ शिजवुन आमास्नी खायाला दे.. मजे आंगात वाइस ताकत यईल...आजनं
रस्ता लय दुर हाय."
क्रमशः 
story by sanjay kamble